मुंबई : काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले यांनी केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची, कपात करण्याची राज्य सरकारची भूमिका दुजाभाव करणारी असल्याचे म्हटले आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील सारिपुत्त नगर येथे रिपाइंचे युवा जिल्हा अध्यक्ष दिवंगत भरत पाईकराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार कामानीचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले की, माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही.
सुरक्षा कमी करण्याची भूमिका दूजाभाव करणारी असून, माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठे थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
Read Also :
- तुकाराम मुंढेंची आता ‘या’ आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
- सरपंचपदाचा लिलाव करणे पडले महागात, निवडणूक आयोगाने दिला दणका
- ‘राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही’, ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव
- ‘30 वर्षांपूर्वी टेस्लाने महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आता…’
- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपच्यावतीने ‘कोरोना योद्धा समर्पित’ बाईक रैली संपन्न