मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात भाकरी फिरवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असतांना आता काॅंग्रेसमध्येही भाकरी फिरवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आज महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर येत असतांना या चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अलिकडेच विदर्भातील नेत्यांनी दिल्लीत अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली होती. यातच नाना पटोले आणि काॅंग्रेसच्या इतर राज्यातील नेत्यांशी असलेल्या वाद चव्हाट्यावर आले होते. तसेच नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, अशीही मागणी एका बाजूने होऊ घातली आहे.
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार
यातच महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात ते राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार असून काॅंग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. यातच अलिकडे मुंबई काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भाई जगताप यांच्याकडून काढून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार का ? अशा चर्चाही एका बाजूला चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही
हेही वाचा…अमित शाह काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात, नांदेडमध्ये जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया