जालना : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे ही मुदत आणखी वाढवून देण्यात यावी, यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहचलं आहे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटलांसोबत तब्बल एक तासांहून अधिक तास चर्चा सुरू आहे. त्यामुळे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का ? की सरकारला मुदतवाढ देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“अराजकता माजवणारे ३ कायदे पारित करायचे आहे म्हणून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन”
तुमचे लोक विचारतात सल्ला कोणाचा ? स्किप्ट कोणाची. इथे सर्व समाज म्हणून मी लढत आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा सल्ला घेतला नाही. तुमचे ऐकून मी त्यांच्याबद्दल बोलणे सोडले आहे. माझ्याकडे येणारे सर्व तज्ञ होते. त्यांना माझा शब्द कळला नाही का ? सगे सोयरे कळले नाही असे होणार नाही. तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले. पण आता विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.
हेही वाचा…“सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेत हे कळलं नाही, पण..,”अजित पवार गटाचा आव्हाडांना खोचक टोला
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, संदीपान भूमरे आणि उदय सामंत जरांगे पाटलांच्या भेटीला पोहचले आहेत. मनोज जरांगे पाटील हे सगे सोयरे कोण ? या एकाच मुद्यावर शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहेत. कायद्यात रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढे ग्राह्य धरू असे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी सांगितले. त्यावर जरांगे पाटील सरसगटला तुम्ही पर्यायी शब्द द्या म्हणाले होते असे म्हणाले. तज्ज्ञांनी माझे शब्द लिहून घेतले होते. तुमच्याकडून होत नसेल तर स्पष्ट सांगा असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर