नवी दिल्ली : संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील तब्बल १४३ खासदारांचं निलंबण करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या विरोधात आता विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तर सरकारला अराजकता माजवणारे तीन कायदे पारित करायचे आहेत म्हणून त्यांनी विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढल्याचा आरोप शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मुंबईतील सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या..,” राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
संसदेच्या कामाकाजावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं, या प्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात मोर्चा काढला. खासदारांची एकच मागणी होती की, चार पाच दिवसांपूर्वी जे लोक संसदेत घुसले. ते लोक संसदेचे सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले ? त्यांना पास कोणी दिला ? यावर सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे. याबाबतची मागणी विरोधकांनी केली होती. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षीत होतं, पण सरकारनं याबाबत काही उत्तर दिलं नाही. याउलट याबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन केल्याचे आजपर्यंतच्या संसदेच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते. विरोधकांना नजर अंदाज करुन सरकार कारभार करु पाहत आहे. देशातील जनता सगळं पाहत आहे, सरकारला याची किंमत मोजावी लागेल. सर्वसामान्य जनता त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवून देईल.
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
दरम्यान, संसदभवन परिसरातून सरकार विरोधात खासदार निलंबनाबाबत आंदोलनातून खासदार वंदना चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, संसदेत झालेल्या घटनेनंतर दोन्ही सभागृहात येऊन सरकारने भाष्य करणे गरजेचे होते, पण ते त्यांनी केलं नाही. आम्ही खासदार असून शासनाचे निर्णय हे पेपरमधून वाचत आहोत. लोकशाहीमध्ये असे चालत नाही, यात ट्रान्सफरन्सी आणि अकाऊंटबिलीटी लागते ही पुर्णपणे या सरकारने धाब्यावर ठेवलेली असल्याची टिका वंदना चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर
हेही वाचा…“अराजकता माजवणारे ३ कायदे पारित करायचे आहे म्हणून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन”
हेही वाचा…“सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेत हे कळलं नाही, पण..,”अजित पवार गटाचा आव्हाडांना खोचक टोला