मुंबई : येत्या २२ जानेवारी अयोध्यात राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी देशातील अनेकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यातच आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राम मंदिराचा मुद्दा भाजपने आता बाहेर काढला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ मंजूर विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
राम ही वैयक्तिक मालमत्ता आहे, असे कुणाला वाटत असेल तर अत्यंत चुकीचे आहे. मन मे बसे राम अशी भारताची परंपरा आहे. मर्यादा पुरूषोत्तम म्हणून रामाला आपण ओळखतो. त्या रामाला कुणीतरी वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वापरून निवडणुकीच्या वेळेस रामाला बाहेर काढले जाते. लोकांच्या श्रध्देचा राजकीय हितासाठी जो वापर सुरू आहे. तो योग्य नसल्याची टिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर केली आहे.
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! शिंदे आणि अजित पवार कमळावर निवडणुका लढवणार; माजी मंत्र्यांचा मोठा दावा
दरम्यान, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपुरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारीक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत. ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर
हेही वाचा…“अराजकता माजवणारे ३ कायदे पारित करायचे आहे म्हणून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन”
हेही वाचा…“सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेत हे कळलं नाही, पण..,”अजित पवार गटाचा आव्हाडांना खोचक टोला
हेही वाचा…“मुंबईतील सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या..,” राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती