नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सध्या काॅंग्रेस विरूद्ध भाजप असा राजकीय सामाना रंगला आहे. संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांचे जळवपास १४३ खासदार निलंबित केलेत. याविरोधात इंडिया आघाडीने जोरदार आंदोलन केलीत. तर यातच आता एका प्रकरणाबाबत काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उद्योगपती गौतम अदानी यांना खिसेकापू म्हटले होते. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने आज राहुल गांधी यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी तसेच राजकीय नेत्यांकडून गैरवर्तन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात आलीय.
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर
दरम्यान, यावेळई कार्यवाहक सरन्यायाधीश मनमोहन म्हणाले की, ही विधाने योग्य नाहीत. निवडणूक आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना नोटीसही बजावली आहे. उत्तर दाखल करण्याची मुदत संपली आहे आणि कोणतेही उत्तर आलेले नाही हे लक्षात घेऊन, निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. याचिकाकर्तेत भरत नागर यांनी कोर्टात भूमिका मांडली. २२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल