मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष फुटले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन नेते घाबरून भाजपासह गेले. त्यांच्या जाण्याची कारणं त्यांच्या भीतीत,डरपोकपणात आहेत. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभागाला घाबरून हे तिकडे भाजपात गेले आहेत. भाजपने यांना त्यांच्या वॉशिंगमशीन मधून स्वच्छ केलं म्हणून त्यांची पापं काही धुवून निघणार नाहीत. शिंदे, पवार आणि त्यांच्यासह गेलेले आमदार आणि नेते का गेले ते सर्वांनाच माहीत आहे. असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की राष्ट्रवादीच्या फुटीला मला कसं जबाबदार धरतात ? तो पक्ष शरद पवारांचा आहे. त्यानंतर शिवसेना त्यांचं मी सांगतो की हे सगळे घाबरून गेले आहेत. कुणाचं तरी नाव घ्यायचं म्हणून माझं नाव वगैरे घेतलं जातं. संजय निरूपम यांचा माझ्याबाबत बोलण्याचा काय संबंध ? त्यांनी त्यांच्या पक्षापुरतं बोलावं. मी माझ्या पक्षाशी निष्ठा बाळगून आहे. मला कधीही पक्ष फोडावासा, बदलवासा वाटला नाही. जे फुटून गेलेत. त्यांना वाटत असेल की संजय राऊतमुळे पक्ष व्यवस्थित सुरू आहे. त्या वैफल्यातून माझ्यावर आरोप केले जातात. मला आंतरराष्ट्रीय प्रवक्ते वगैरे म्हटलं जातं. मला ते महत्व देत आहेत चांगली गोष्ट आहे. असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
दरम्यान, पुढे मी कधीही मंत्रिपदाचा विचार केलेला नाही. इतकी वर्षे मी दिल्लीत आहे. मात्र मंत्रिपदाचा विचार केला नाही. मला आठ दिवसांसाठी ईडी आणि सीबीआयचं नियंत्रण माझ्याकडे हवं आहे. आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मला दाखवायचं आहे की या यंत्रणा कशा काम करतात. असेही राऊत म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं