मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अलिकडेच धमकीचा फोन आला होता. एका प्रकरणामध्ये डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरूणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी याप्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…“रामदास कदम झेंडू बॉम्ब लावून रडत असतात” सुषमा अंधारेंचा रामदास कदमांना टोला
तक्रार दाखल केल्यानंतर बुकी अनिल जयसिंघानी गेल्या काही दिवसापासून फरार होता. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विशेष ऑपरेशन आखण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता तब्बल पाच दिवसानंतर गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.
हेही वाचा….“ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले”, एकनाथ शिंदे
आरोपी गेल्या १६ महिन्यांहून अधिका काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्हात मदत करण्याची मागणी करत १ कोटी रूपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप केला आहे.
Read also
- हेही वाचा…““नाशिकचे प्रवीण अलई यांची भाजपच्या ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी निवड,” बावनकुळेंनी केली घोषणा
- हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकरी आडवा झाला, अन् अजून पंचनामे नाहीत,” विरोधी पक्ष सभागृहात आक्रमक
- हेही वाचा…रामदास कदमांना ‘बाम्ब लाव्या’, ‘तात्या विंचू’ म्हणत होतो, पण आता त्यांना ‘कोकणातील जोकर’ अशी नवी उपमा,” भास्कर जाधव
- हेही वाचा…“सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही, त्याचा आम्ही टोकाचा विरोध करु” जितेंद्र आव्हाडांनी मांडली आपली भूमिका
- हेही वाचा…“अमित शहा यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे केमिकल लोचा”