मुंबई : उद्धव ठाकरे यांना सत्तेची भुरळ पडली होती. म्हणूनच त्यांनी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जाहीर सभेत म्हटलं. दापोली येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती, ती सर्वांनी ऐकली. मात्र मागच्या आठवड्यात येथे ठाकरेंच्या सभेचा फुसका बार झाला. त्यांच्याकडून थयथयाट आणि आदळआपट सुरू असून त्यांच्याकडे मोजून २ ते ३ शब्द आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका बदलली, सावरकर आणि हिंदुत्वावर त्यांन बोलण्याचे टाळले. असंही शिंदेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
पुढे बोलतांनी त्यांनी २०१९ ची आठवण सांगितली. गद्दारी आम्ही नाही तर २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. बॉम्बस्फोट करणाऱ्या लोकांशी संबंधित लोकांशी मांडीला मांडी लावून आपण कसे बसू शकतो? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, राहुल गांधी त्यांच्या विरोधात बोलला तरी आपण त्यांना काही बोलू शकत नाही, सत्तार वर्ष देशाची लुट करणाऱ्या टोळीसोबत आपण आहात की ३० रद्द करणाऱ्यांसोबत आहात? की देशासाठी काम करणाऱ्या देशभक्तांसोबत आपण आहात? असा खोचक सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया
पुढे त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कारस्थान करून व्यासपीठावरून खाली उतरवायला लावलं. तोच डाव रामदास कदमांबरोबर आखला होता. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांबद्दल कारस्थान करू शकतो? आपल्याच खासदाराला पाडण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊ शकतो? असा नेता मी कुठेच पाहिला नाही. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
दरम्यान, आज बाळासाहेब असते तर मनोहर जोशींबद्दल असे केले असते का. बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. धर्मवीर आनंद दिघे जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर आणण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला. कार्यकर्त्याला पुढे नेणारे बाळासाहेब होते. तुम्ही कार्यकर्त्याला संपवायला निघालेत. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता मोठा होतो, तेव्हाच पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला की, तुमच्या पोटात दुखणे सुरू होते. राज ठाकरेंपासून नारायण राणेंपर्यत आणि रामदास कदमांपर्यंत तुम्ही नेत्यांना कार्यकर्त्यांना संपवलं. असा आरोपही शिंदेंनी ठाकरेंवर लावला.
Read also
- हेही वाचा…““राज ठाकरेंपासून नारायण राणे, रामदास कदमांना तुम्ही संपवलं”, शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
- हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
- हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू
- हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका
- हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात