दापोली : रामदास कदम आणि गुलाबराव पाटलांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं बंद केली जातात. याने पक्ष मोठा कसा होणार.? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा. तुम्ही म्हणता, दरवाजा उघडा आहे, ज्याला जायचे त्यांनी जा. सगळेच जातील आणि तुम्ही दोघेच राहतील. हम दो हमारे दो. मी बोलतोय कारण आम्ही सहन केलं आहे. यांनी किती लोकं घालवले. तुमचा स्वत: च्या नेतृत्वावर विश्वास नाही. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया
काल दापोली येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. त्या सभेत उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील पक्षांबाबतची काही वक्तव्ये दाखवण्यात आलीत. तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांवर हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर मनोहर जोशींबद्दल असे केले असते का. बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. धर्मवीर आनंद दिघे जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर आणण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला. कार्यकर्त्याला पुढे नेणारे बाळासाहेब होते. तुम्ही कार्यकर्त्याला संपवायला निघालेत. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता मोठा होतो, तेव्हाच पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला की, तुमच्या पोटात दुखणे सुरू होते. राज ठाकरेंपासून नारायण राणेंपर्यत आणि रामदास कदमांपर्यंत तुम्ही नेत्यांना कार्यकर्त्यांना संपवलं. असा आरोपही शिंदेंनी ठाकरेंवर लावला.
हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
पुढे त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कारस्थान करून व्यासपीठावरून खाली उतरवायला लावलं. तोच डाव रामदास कदमांबरोबर आखला होता. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांबद्दल कारस्थान करू शकतो? आपल्याच खासदाराला पाडण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊ शकतो? असा नेता मी कुठेच पाहिला नाही. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
दरम्यान, ज्या लोकांनी संघटनेसाठी जीवाची पर्वा केली नाही, घरावर तुळशीपत्र ठेवले, स्वत: वर केसेस घेतल्या, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता. ही सगळी देवासारखी माणसं आहेत. तुम्हाला त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्या रामदास कदमांनी पक्षाला वाढवलं. त्यांना तुम्ही संपवलं. योगेश कदम याची राजकारणाची सुरूवात झाली, त्याला तुम्ही संपवायला निघालात. दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्या.
Read also
- हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
- हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू
- हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका
- हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
- हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल