मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निवडणुक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ठाकरे गटातील नेते चांगलचे आक्रमक झालेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते आपल्या जाहीर सभामधून शिंदेंवर निशाणा साधत आहेत. यातच आज सामानातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका
देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींवर अखेर तोंड उघडले आहे. अदानी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली अस सामानातून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
तसेच शहा यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे. त्याचा पुरावा आहे. अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे अमित शहा सांगतात. मग यावेळी इडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत ? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याचवेळी कायदामंत्र्यांनी, रिजीजू, यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू, हे न्यायव्यवस्थेविरूद्ध बेबंदपणे बोलत आहेत. असंही म्हटलं आहे.
हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, देशाची लोकशाहीची ही सध्याची अवस्था आहे. हिंदुस्थानात लोकशाही मारली जात आहे असे राहुल गांधी परदेशात बोलून गेले. आता त्यांनाही देशविरोधी ठरवून किंमत मोजावी लागेल. राहुल गांधी यांचे लोकसबा सदस्यसत्व रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. हे कसेल लक्षण मानायचे? देशात लोकशाहीच्या नावाने धमकी राज सुरू झाले आहे. वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे.
Read also
- हेही वाचा…“रामदास कदम झेंडू बॉम्ब लावून रडत असतात” सुषमा अंधारेंचा रामदास कदमांना टोला
- हेही वाचा….“ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…““राज ठाकरेंपासून नारायण राणे, रामदास कदमांना तुम्ही संपवलं”, शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
- हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
- हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू