मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा ५ मार्च रोजी झाली. त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आमच्यासभेचा विक्रम, उच्चांक त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातून माणसं नेलीत तरी ते आमच्या जवळपासही येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची ही सभा ढ विद्यार्थ्यांची होती. असा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
काल दापोली येथील गोळीबार मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. त्या सभेत शिंदे गटाच्या नेत्यांकडून ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काल रामदास कदम यांचं भाषण सुरू झालं आणि माणसं सभेतून निघायला लागलेत. त्यांना कालपर्यंत मी बाम्ब लाव्या म्हणत होतो. कोकणातला तांत्या विंचू म्हणत होतो. त्याच कारण म्हणजे त्यांनी मागील आठ दिवसापासून दिलेल्या मुलखततील मुद्यांपैकी एकही मुद्दा मांडला नाही. त्यात त्यांनी मला कसं संपवलं, योगेश कदमांना कसं संपवलं. मुख्यमंत्री कसा झालो नाही. असं त्यांनी म्हटलं. परंतु जर मुख्यमंत्री म्हणून रामदास कदम यांचा चेहरा खरोखरच समोर आणला तर महाराष्ट्राची घोर चेष्टा असेल. असा शाब्दिक हल्ला भास्कर जाधव यांनी कदमांवर चढवला.
हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू
रामदास कदम यांना ठाकरे घराणेने मंत्री केलेत. त्यांचा मंत्री म्हणून काय प्रभावर होता. ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे रामदास कदम यांना नवीन उपमा देण्याची गरज आहे. ते म्हणजे कोकणातील जोकर. तसेच एकनाथ शिंदे यांना गेलेलं नाव आणि चिन्ह कसं टिकेल याचा त्यांनी विचार करावा, आणि ते चिन्ह आणि नाव पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल. असा आशावादही भास्कर जाधव यांनी मांडला.
Read also
- हेही वाचा…“सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही, त्याचा आम्ही टोकाचा विरोध करु” जितेंद्र आव्हाडांनी मांडली आपली भूमिका
- हेही वाचा…“अमित शहा यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे केमिकल लोचा”
- हेही वाचा…“रामदास कदम झेंडू बॉम्ब लावून रडत असतात” सुषमा अंधारेंचा रामदास कदमांना टोला
- हेही वाचा….“ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…““राज ठाकरेंपासून नारायण राणे, रामदास कदमांना तुम्ही संपवलं”, शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप