मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याबाबत चर्चा सुरू असतांना सभागृहात मंत्रीच हजर नसल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतला.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कराव्यात अन् त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत विरोधी पक्षातील नेत्यांनी सभा त्याग केला.
हेही वाचा…““राज ठाकरेंपासून नारायण राणे, रामदास कदमांना तुम्ही संपवलं”, शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग सात दिवस झाले. सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपीठीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत. त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करा, आजच्या आज उपाययोजना करून तात्काळ निर्णय करावा, जयंत पाटील यांची मागणी मान्य करावी. अशी सभागृहात मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या गंभीर नुकसानाचे राजकारण करण्याची भूमिका विरोधी पक्षाची नाही. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा भागात मोठी गारपीट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, ही गंभीर बाब माजी मंत्री जंयत पाटील यांनी विधानसभेत मांडली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शेतीचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्यासाठी यंत्रणा नसेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आजच्या आज सरसकट महसूल मंडळाप्रमाणे एकरी काहीतरी मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात द्राक्ष, आंबा, डाळींब, केळी, कांदा अशा अनेक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप असल्याने हतबलतेची भूमिका शासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
Read also
- हेही वाचा…रामदास कदमांना ‘बाम्ब लाव्या’, ‘तात्या विंचू’ म्हणत होतो, पण आता त्यांना ‘कोकणातील जोकर’ अशी नवी उपमा,” भास्कर जाधव
- हेही वाचा…“सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही, त्याचा आम्ही टोकाचा विरोध करु” जितेंद्र आव्हाडांनी मांडली आपली भूमिका
- हेही वाचा…“अमित शहा यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे केमिकल लोचा”
- हेही वाचा…“रामदास कदम झेंडू बॉम्ब लावून रडत असतात” सुषमा अंधारेंचा रामदास कदमांना टोला
- हेही वाचा….“ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले”, एकनाथ शिंदे