नाशिक : राज्यातील ४० गद्दार गेल्यानंतरही मला हे माहित होतं की जनता आपल्याला सोडणार नाही. जनता उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे याची मला खात्री आहे. या महाराष्ट्राला आपल्याला चांगले दिवस दाखवायचे आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या साफ आणि स्वच्छ विरूद्ध स्वार्थी आणि गलिच्छ असं झालं आहे. मुख्यमंत्री हे घटनाबाह्य असून अलीबाबाही आहे. अशी प्रखर टिका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्यावर केली.
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गद्दार आहेत, त्यांनी मी आलीबाबच म्हणणार. कारण ते महाराष्ट्राला लुटत आहेत. दर दोन दिवसांनी ते दिल्लीला जातात. आज काय बदल होतो आहे म्हणून बोलवलं आहे का ? असा खोचक सवाल देखील ठाकरेंनी केला.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
दरम्यान, घटनाबाह्य मुख्यमंत्री दर आठवड्यात दोनदा दिल्लीला जाणार असतील तर महाराष्ट्रांच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार ? ठाणे, मुंबई, नाशिकची परिस्थिती कशी झाली आहे. कुणीही खूश नाही. एका वर्षात एक तरी उद्योग किंवा रोजगाराची संधी आली नाही. येवल्यात मी आलोय तुम्हीच मला सांगा नोकरीच्या संधी किंवा उद्योगाच्या संधी किती आल्यात. ? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित लोकांना केला.
READ ALSO :
हेही वाचा…पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या यांच्या हस्ते कोथरुडच्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचा सत्कार
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक