मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या राज्यातील राजकीय नेत्यांच्या सभांमुळे चर्चेत आलं आहे. अलिकडेच खेड येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. त्यांनतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेत लोकांची गर्दी उद्धव ठाकरेंपेक्षा कमीच दिसली. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टोला हाणला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यावरून टिका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांपेक्षा खुर्च्याच जास्त असतात अशी टिका केली. एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेचे नाहीत. अशी टिकाही त्यांनी केली.
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
दरम्यान, यावेळी उपस्थितीत पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. मी आज काहीही राजकीय बोलणार नाही. सण-समारंभानिमित्त इथे आलो आहे, अशा ठिकाणी राजकीय भाष्य करणं हा बालिषपणा ठरेल. काही पक्ष असं करत असतात.पण ते तसेच आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. आज या ठिकाणी मी फक्त इतकचं म्हणेण की, सर्वांनी आजचा सण आनंदात साजरा करावा.
Read also
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
- हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
- हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान
- हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
- हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा