मुंबई : विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीसही देण्यात आली आहे. यातच संजय राऊतांवर कारवाई होणार असल्याचे संकेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे
कोल्हापुरातील शिवगर्जना अभियाना दरम्यान संजय राऊतांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले होते. यावेळी सत्ताधारी आमदारांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. याप्रकरणाबाबत हक्कभंग समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ
दरम्यान, हक्कभंग समितीने अलिकडेच संजय राऊतांना नोटीस पाठविली होती. त्यावर उत्तर देतांना राऊतांनी हक्कभंग समितीत असलेल्या सदस्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यातच आता विधिमंडळाचा अवमान, हक्कभंग प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्युज १८ लोकमत ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
Read also
- हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
- हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
- हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
- हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
- हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”