मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात एकच गोंधळ बघायला मिळाला. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर टिका करतांना मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टिका केली. त्यावर अजित पवारांसह जयंत पाटील आणि इतर आमदारांनी यावर जोरदार आक्षेप घेत जोरदार प्रहार केला. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
सभागृहात वक्तव्य केल्यानंतर दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी शरद पवार यांच्याविषयी काहीही चुक बोललो नाही. तुम्ही रेकॉर्ड तपासून पाहा. मी एवढचं म्हणालो की, हे जे महागद्दार आहेत, ते भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात. एवढचं मी बोललो. यामध्ये मी शरद पवार यांचा कोणत्याही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य तपासावे, त्यामध्ये काही अयोग्य आढळल्यास ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन आरोप खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. असं दादा भूसे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मागण्या मान्य करा, अन्यथा..,” शेतकऱ्यांनी सरकारला दिला ४० दिवसांचा अल्टिमेटम, राजकारण तापणार
संजय राऊत म्हणाले की, मला खासदारकी तुम्ही दिली का ? महाराष्ट्र विधानसभेतील जे सर्व आमदार आहेत. त्यांनी मला खासदारकी दिली आहे. तुम्हाला कोणी मतं दिली? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने तुम्हाला आमदार आणि मंत्री केलं ना. आता निवडून येऊन दाखवा, आमची मतं म्हणता ना, तुमची मतं कुठली, ही शिवसेनेची मतं होती. आता तुमच्याकडे मतं असतील तर पुन्हा निवडून येऊन दाखवा असं आवाहन राऊतांनी दिलं.
Read also
- हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे
- हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा…पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, भास्कर जाधव विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक
- हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”