मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृहात एकच गदारोळ केला. त्यावर दादा भुसे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिल्याने थोडासा गदारोळ कमी झाला. अशा राजकीय वातावरणात आज आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या विषयाने सभागृहात आज हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.
हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
विधीमंडळाच्या सभागृहात आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नावरून प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आदित्यजींकडे बघून प्रश्न विचारला का ? अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. इतकंच नाही तर सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणताच सभागृहात बाकं वाजू लागली.
हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीनंतर आदित्य ठाकरे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. ही काही राजकीय धमकी आहे का? आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे..? यावर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मस्करी केली की, आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं. यावर मग फडणवीसांनी पुढची गम्मत घेतली की, कोणाचंही तोंड कसं बंद करायचं? याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, अनुभवातून बोलतोय. असं म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
Read also
- हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”
- हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे
- हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा…पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, भास्कर जाधव विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक
- हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”