नाशिक : दिल्ली येथे झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत चार जण सोडले तर सगळे हजर होते. त्यामुळे सध्या जो दावा केला जात आहे. त्यात काही अर्थ नाही. परंतु निवडणुक आयोग किंवा कोर्टात जाण्यास सांगत आहेत. ते त्यांच्यावर उलटफेर होईल. अस शरद पवार यांनी नाशिक मध्ये बोलतांना म्हटले आहे. तसेच दिल्लीच्या बैठकीत २३ राज्याचे राष्ट्रवादीचे राज्यप्रमुख उपस्थित होते. असंही त्यांनी नमुद केले आहे.
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
पक्षावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर नाशिकमध्ये जाऊन काम करावं. त्यावेळी मजबुतीने उभा राहण्यासाठी नाशिकमध्ये अनेक सहकारी आहेत. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव केला होता. त्यामुळे जे तिकडे चाललं आहे. त्याला काही अर्थ नाही. असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!
राज्यात सत्ताधारी जसे महत्वाचे आहेत. तसे राज्यात देशात विरोधी पक्ष देखील महत्वाचा आहे. परंतु विरोधी पक्ष हा दुबळा कसा होईल. अशा प्रकारची निती भाजपची आहे. तरूणपणात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, यांचं कामं बघितलं. या सगळ्या नेत्यांनी विरोधकांच्या संदर्भात अनेक भूमिका मांडली. परंतु सध्याच्या काळात विरोधकांचा आवाजच दाबून टाकावा, असं कधी पाहिलं नव्हतं. असंही शरद पवार म्हणाले. असं असेल तर त्याच्याशी संघर्ष करावा लागेल, अन् लोकशाही जिवंत ठेवावी लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
भ्रष्टाचाराच्या काळात छगन भुजबळ तुरूंगातून बाहेर आलेत. तरी त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं. तुम्ही त्यांच्या संघर्षाच्या काळात साथ दिली. परंतु आता तुमच्या संघर्षाच्या काळात छगन भुजबळ सोडून गेलेत. याबद्दल वाईट वाटतं का ? यावर शरद पवार म्हणाले की, त्यांना मी दोष देणार नाही, हा दोष माझा आहे. मी त्यांना असेस करू शकलो नाही. पण यातून लोकांची नैतिकता दिसून येते. असंही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?