रायगड : रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे यामध्ये १५ ते २० मुलांचाही समावेश आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या घटनेवर लक्ष्य ठेऊन आहेत.
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस म्हणून अजित उत्सव साजरा करण्याचा काल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात निमंत्रण पत्रिका देखील काढण्यात आली. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का? समृद्धी महामार्गावर अपघात होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून शपथविधी करत होते आणि आता इरसाळवाडी येथे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना हे वाढदिवसाच्या पार्ट्या करतायत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सगळी लाज लज्जा सोडून दिली आहे का? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान