सांगली : गेल्या महिन्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यासंदर्भात अजित पवार यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदाराने राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे.
“ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. MPSC च्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले.
आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला महापालिका निवणुकीत जागा दाखवून देवू – नाना पटोले
३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच MPSC आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही MPSC ची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते.. अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत pic.twitter.com/yIISYP1oT1
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 1, 2021
अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला आत्महत्येचा मार्ग आणखी काही विद्यार्थ्यांनी निवडावा, असे या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतेय काय? म्हणूनच अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ ते अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेले नाही, असा घणाघात पडळकर यांनी यावेळी केला.
Read Also :
- पुण्यात रस्त्यांची चाळण, ठेकेदाराच्या कामावर महापालिकेचे नियंत्रणच राहिले नाही; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ
- तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
- आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”