पुणे : पुणे महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी समान पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. सदर काम करताना शहरातील अनेक मुख्य रस्ते खोदून मोठया लाईन टाकल्या जात आहेत. तदनंतर हे खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट केले जात आहे. तसेच एम.एन.जी.एल च्या माध्यमातून देखील खोदाई करून लाईन टाकणचे काम केले जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला कोणते काम चालू आहे, असे विचारले असता त्यांला काहीच सांगता येत नाही. कारण महापालिकेचे L&T च्या कामावर मनपाचे नियंत्रण नाही, अशी माहिती मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली आहे.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
याबाबत दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. धुमाळ यांनी म्हटले आहे की, एखादा चांगल्या पध्दतीचा डांबरीकरण केलेला रस्ता असेल व त्या रस्त्यावर जर पाईपलाईनची खोदाई करीत असेल तर त्या लाईन टाकल्यानंतर सदर खोदाई केलेल्या रस्त्याची दुरूस्ती ही त्वरीत केली जात नाही. तर डाबंराच्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटने डागडुजी केली जाते हे चुकिचे आहे. चांगला रस्ता विद्रूप केला जातो. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नसते. काही ठिकाणी एम.एन.जी.एल च्या माध्यमातून खोदाई केल्यावर त्यामधून समान पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकले जात असून पाणीपुरवठा विभागाकडून याचे बिल घेतले जात आहे. जागेवर माहिती विचारली असता कोणालाही कोणाचे काम चालू आहे याची माहिती दिली जात नाही.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
वास्तविक पाणीपुरवठयाचे पाईप जवळून एम.एन.जी.एल च्या लाईन टाकणे धोकादायक आहे. भविष्यात देखभाल दुरूस्तीची कामे करताना मोठी अडचण निर्माण होवू शकते. समान पाणीपुरवठा योजनेचे काम जागेवर चालू असताना पुणे महापालिकेचे अधिकारी यांनी समक्ष कामाची पाहणी करणे बंधनकारक असताना मनपाचे अधिकारी उपस्थित नसतात, संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता कोणतीही माहिती नसते. कोटयावधींचा खर्च मनपा करीत असून अधिकारी कामाची पाहणी देखील करत नाहीत, ही बाब खेदजनक आहे.
हे पण वाचा : अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
तसेच शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे मीटर बसविण्याचा प्रकार चालू असून नागरिकांना हे मीटर बसविणे बंधनकारक आहे असे सांगितले जात आहे. परंतू अद्यापही पाण्याचे लाईनचे नेटवर्क पूर्ण नाही, पाणी कमी दाबाने अथवा अचानक येणे बंद झाल्यास तो अडथळा शोधायला महिन्याचा कालावधी घालविला जातो. सर्वप्रथम पाण्याच्या लाईनचे नेटवर्कचे नकाशे इंत्यभूत माहितीसह उपलब्ध होणेसाठी मागील ५ वर्षात पाण्याच्या लाईन टाकणेचे काम ज्या-ज्या अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली झाले त्यांना या कामाची माहिती एकत्रित करणेचे आदेश दयावेत. मागील ५ वर्षांच्या कामाच्या माहितीसह याकामी संबंधित सर्व कनिष्ट अभियंता, उप अभियंता यांची एकत्रित बैठक खातेप्रमुखांच्या उपस्थितीत बोलवावी. अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या आहेत त्या अर्धवट अवस्थेत सोडलेल्या आहेत.
हे पण वाचा : महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
तरी समान पाणी पुरवठा योजनेशी संबंधित सर्व अधिकारी यांना कामाच्या ठिकाणी समक्ष जागापाहणी करणेचे आदेश देण्यात यावेत. यावेळी आम्ही देखील समक्ष कामाची पाहणी करणेस येणार असल्याने आम्हास त्याबाबतची वेळ लेखी स्वरूपात कळविण्यात यावी, असे धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Read Also :
- तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
- आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”
- पूरग्रस्त भागात संपूर्ण वीजबिल माफी अशक्य; मात्र दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा