मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी, सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. त्यानंतर प्रसाद लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत पलटी मारली खरी पण त्यांच्या वक्तव्यावरुन अजूनही टीका सुरुच आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर तुफानी हल्ला चढवला. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दात राजन साळवींनी लाड यांना प्रत्युत्तर दिलं.
गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
“आधी आमदारकीचा राजीनामा दे कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झालाय… जर हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील”, अशा शब्दात राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतलाय.
“ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ज्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला.
“नाना पटोले-अनिल देशमुख बनू नका”च्या टीकेला, “अंगावर आलात तर शिंगावर घेऊ”ने प्रत्युत्तर
नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.
Read Also :
- आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”
- पूरग्रस्त भागात संपूर्ण वीजबिल माफी अशक्य; मात्र दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
- “या संकटात ‘रिकामटेकडे’ काय करतायेत हे जनता पाहतीये; राऊतांनी मीडिया समोर येणं सोडून आणखी काय केलं?”