पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येतील. यामध्ये पाच उमेदवार निश्चितच निवडून येणार आहेत. मागच्यावेळी आम्हाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, त्यामुळे यावेळी त्यांना आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे घोडेबाजाराचा प्रश्नच नाही. अपक्ष मतदान दाखवून शकत नाही. अस मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
“हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
राज्यात महाविकास आघाडी सरकार असून प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. राज्यात काहीही असंल तरी स्थानिक परिस्थिती विचारात घ्यावी लागते. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेले मत हे त्यांचे वैयक्तीक असू शकतं. तसेच राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या निवडणुकीत वकिलांच्या मार्फत न्यायालयात जाऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.
“खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
केंद्र सरकारने जवळपास 86 हजार 912 कोटी रूपये राज्यांना वितरीत केले आहेत. अजूनही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे 15 हजार 502 कोटी रूपये येणं बाकी आहे. ती रक्कम केंद्र सरकारने लवकर दिल्यास राज्यातील विकासकामे जोरात सुरू होतील, अशी आशा देखील अजित पवारांनी व्यक्त केली. तसेच कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने राज्यात काळजीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मास्क लावणं गरजेचं आहे. राज्याने घालून दिलेल्या नियमाचं पालन देखील करणं महत्वाचं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
दरम्यान, नाशिक येथे हनुमानाच्या जन्म स्थळावरून साधूंमध्ये गोंधळ उडाला होता. त्यावर बोलाताना अजित पवार म्हणाले की, महंत चर्चेला बसले आणि माईक मारला, यातून काय मिळणार? याचाही सर्वांनी विचार करावा, तसेच राज्यात अनेक ठिकाणांच्या नामकरणाच्या मागण्या आल्या आहेत. मात्र तो मुद्दा सध्या गरजेचा नाही असंही ते म्हणाले.
Read also:
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ