पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तब्बल २८ वर्षाचा भाजपचा हा बाल्लेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्धवस्त केला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
अजित पवार म्हणाले की, चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. परंतु माझी परिस्थिती सध्या थोडी खुशी- थोडी गम अशी झाली आहे. कसब्यात 1995 साली वसंत थोरांच्या नंतर भाजपचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर सातत्याने ती जागा गिरीश बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिंकली. यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार देत असतांना अतिशय रवींद्र धंगेकरांच्या रूपाने करण्यात आली. अन् तिथेच आम्ही अर्थी लढायली जिंकलो. कारण रविंद्र धंगेकर हे अनेक वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतोय. ते अगोदर मनसेत होते, त्यानंतर त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अनेकांशी त्यांचा संबंध येतो. त्यावेळेस तळागळात काम करणारा कार्यकर्ता स्कुटरवर सकाळी तबोडतोब जाऊन नागरिकांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेणारा रवी अशी त्याची ओळख राहिली आहे.
हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
रविंद्र धंगेकरांनी मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या ताकदीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांशी एकोपा करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक दिवस पुण्यात तळ ठोकून रोड शो, बैठका घेत होते. निवडणुका जिंकण्याकरीता ज्या ज्या बाबी वापरल्या जातात. त्या सर्व राज्यातील मंत्र्यांनी केल्या. त्यात रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने मतदानाच्या अगोदर आंदोलनही केले होते. इतपर्यंत त्यांची मजल गेली. असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, सगळ्या गोष्टींचा वापर करून सुद्धा कसब्यातील जागा महाविकास आघाडीने खेसून आणली आहे. अन् एक वेगळा संदेश महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न झाला. अशीच पुनरावृत्ती जर चिंचवडमध्ये झाली असती. परंतु आम्हाला ज्यांनी तिकीटं मागितली होती. तिथे दोघंही उभे राहिलेत. राहुल कलाटे यांना बराच सांगण्याचा प्रयत्न केला. बाबा राहुल आता थांब..! परंतु त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही. तो उभा राहिला. तसेच त्याचा फॉर्म निघू नये, म्हणून देखील मोठ्या गोष्टी घडल्या. तसेच सत्ताधाऱ्यांनी त्याला कसं थांबावलं. ते मला रॅली, रोड शो करतांना सतत माहिती मिळत होती.
हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
तसेेच या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये सहानुभूतीचा मुद्दा समोर येत होता. परंतु सध्या महागाई, आणि शिवसेनेचे चिन्ह काढून घेण्यात आले. ती भावना शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळाली. तसेच हीच संधी असून महाविकास आघाडीच्या उमेदवाला देऊन बदला घेण्याची होती. परंतु सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सगळ्या यंत्रणांचा वापर करून सगळे मंत्रिमंडळ त्याठिकाणी होते. परंतु म्हणावं तसं परिणाम कसब्यात झाला नाही. परंतु यामधून महाराष्ट्राला एक संदेश गेला आहे. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र येऊन विजयी होणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं तर विजय होतो. हे यातून दिसून आलं आहे. असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा.“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार