मुंबई : महायुतीत सर्वात जास्त उमेदवार हे भाजपचे असणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच शिंदे आणि अजितदादांचे काही उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील, असा दावा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. परंतु काही दिवसांपुर्वी अशी शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली होती. त्यावरून आता अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…भामरेंचा पत्ता कट, प्रतापराव दिघावकर भाजपचे नवे उमेदवार, धुळ्यात कमळ फुलणार का ?
बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची चिंता करण्यापेक्षा त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय आहे ते समजून घ्यावं. कदाचित त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार. आमचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: चं बघावं दुसऱ्याची काळजी करू नये. असा टोलाही मिटकरी यांनी कडू यांना लगावला.
हेही वाचा…माढा लोकसभेतून जानकरांना उमेदवारी, शरद पवारांच्या ‘या’ शिलेदारानेही थंड थोपटले
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीत आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. यातच अजित पवार गटाला फक्त ३ जागा मिळणार असून काही उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर लढणार अशी चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या जागापैकी सर्वात जास्त भाजपला मिळणार असून काही जागांवर राष्ट्रवादी आणि शिंदेंचे उमेदवार कमळावर लढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
हेही वाचा…“सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्याचा वरदहस्त आहे का?” 10 कोटीचा घोटाळा, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…“जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला, तितक्याच राष्ट्रवादीला ,” भुजबळांनी स्पष्टच सांगितले