पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुीकीसाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुक लढवणारे राहुल कलाटे यांनी देखील श़ड्डू ठोकला आहे.
हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
सुरूवातीला त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु अचानक राष्ट्रवादीने नाना काटेंना उमेदवारी दिल्याने त्यांनीही निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र मला उमेदवारी मिळू शकला नाही. त्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणुक लढणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास असल्याचं राहुल कलाटे यांना एका वृत्तसंस्थेची बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकाकरीता आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून उमेदवार घोषीत करण्यात आले. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. तर कसब्यातून भाजपने हेमंत रासनेंना पंसती दिली आहे. या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या, यासाठी भाजपने प्रयत्न करत आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
दरम्यान, कसब्यातील जागा महाविकास आघाडीने काॅंग्रेसला सोडली आहे. त्याठिकाणी काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चिंचवडची जागा आघाडीने राष्ट्रवादीला सोडली. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट निवडणुक लढणार आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी, थेट लढत होण्याची शक्यता
- हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
- हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
- हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल