पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना डावलून भाजपने हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली आहे. यातच पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून महाविकास आघाडीला विनंती केली जात आहे. त्यावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाहीत. असा विरोधी पक्षाचा सुर उमटत आहे. तर आम्ही कसब्यातील उमेदवार बदलून टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही माघार घ्या. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“हेही वाचा..रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
आम्ही भाजपा परिवार म्हणणाऱ्या भाजपला टिळक परिवाराचा जाणीवपुर्वक विसर पडला आहे. अखेरपर्यंत पक्षाच्या सच्च्या मुक्ता टिळक यांना हीच भाजपची श्रद्धांजली म्हणावी का ? असाी सवाल राष्ट्रवादीने केला आहे. निवडणुकांपेक्षा मानवी भावना आणि कार्यकर्त्यांचा सन्मान महत्त्वाचा असतो. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी टिळक परिवाराला डावलून, हेमंत रासने यांना उमेदवारी देऊन, भाजपने या दोघांचा अवमान केला आहे. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
हेही वाचा..निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
अखेरपर्यंत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या राहिलेल्या मुक्ता टिळक यांच्या निष्ठेचे हेच फळ भाजपला त्यांच्या परिवाराला द्यावेसे वाटले का ? हा प्रश्न इथं सर्वात महत्त्वाचा आहे. दुर्धर आजारपणातही पक्षाला माझी गरज आहे, मी मतदानाला जाणार, असे म्हणत मुक्ताताईंनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करून पक्षासाठी मोलाचे योगदान दिले होते. अशा सच्चा आणि निष्ठावान पक्ष कार्यकर्त्या असेलेल्या मुक्ताताईंना अशाप्रकारे भाजप श्रद्धांजली वाहत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. आज पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत रासने यांच्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन भाजपने केले.
हेही वाचा….“शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
हीच ताकद भाजपला टिळक कुटुंबीयांच्या पाठीशी उभी करता आली नसती का ? असा सवालही राष्ट्रवादीने केला आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले त्यांना बळ द्यायचे सोडून फक्त निवडणुकीतील फायदा भाजप बघत आहे. याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच रोष पाहायला मिळत आहे. तरीही निवडणुक बिनविरोध केल्यास टिळक परिवाराला उमेदवारी तयारी असल्याची मुक्ताफळं भाजप प्रदेशाध्यक्ष उधळत आहेत. त्यामुळे निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अटी शर्थी लावून टिळक परिवाराला वाऱ्यावर सोडायचे काम भाजप करत असल्याचे उघड आहे.
Read also
- “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
- हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
- हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
- हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
- हेही वाचा..“बापटांना घाम फोडणारा नेता आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीत उभा,” हेमंत रासनेंची डोकेदुखी वाढणार ?