नाशिक : राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं लोकांचं मनपरिवर्तन व्हायला वर्षानुवर्ष लागायचं. २० वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली. लोकांचं मनपरिवर्तन होण्यासाठी तेथील शेतकऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात राहावं लागतं. एक सभा घेतली म्हणजे सर्व काही झालं असं नाही होत. गर्जना देऊन कुणाचेही पोटं भरलेली नाही. त्यासाठी काम महत्वाचं आहे. असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”
सध्याच्या काळातील लोकांना सगळं समजायला लागलं आहे, ते इतकं मुर्ख राहिले नाहीत की एखाद्या पक्षाने झेंडा बदलला अन् दुसरा झेंडा तिथे लागला म्हणून लोकांचा प्रवाह तिथे वाहून जाईल इतके लोकं मुर्ख राहिलेले नाहीत. तसेच आपण आता नाशिकचा विषय काढला तर तिथे द्राक्ष, कांद्याचा प्रश्न आहे. तुम्हाला तिथे मंदिर, मजिदचा विषय काढून चालणार नाही. असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांची मालेगावात विराट सभा होत आहे. या विराट सभेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार आहेत. ते पाहणं महत्वाचं आहे. तर सभेसाठी उद्धव ठाकरे आता नाशिकहून मालेगावला रवाना झाले आहे. तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त मालेगावात लावण्यात आला आहे.
Read also
- हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
- हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
- हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
- हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
- हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड