मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन देशात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांना आणखी कमजोर करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. यातच काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यानंतर आता काॅंग्रेसकडून संकल्प सत्यागृह सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा…“राहुल गाधींना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा,” एकनाथ शिंदेंची मागणी
मोदी आडनावावरच्या टिप्पणीनंतर राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ आजपासून काॅंग्रेसने राजघाटावर दिवसभर संकल्प सत्यागृह केला जात आहे. या सत्याग्रहात काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या सत्यागृहा सहभागी झाले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली असून परिसरात कलम १४४ लागू केले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, मोदींबाबत केलेलं ते वक्तव्य भोवलं”
आज मुंबईत देखील राज्यातील काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी संकल्प सत्यागृह सुरू केला आहे. मुंबईत अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजपने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे आंदोलन करण्यात आले.
Read also
- हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”
- हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
- हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले
- हेही वाचा…“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत