अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या तिकीटावर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांसाठी आयोजित केलेले रॅलीला संबोधित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्रावरून कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला असून आजवर या मुद्दावर जे लोक पोपटासारखे बोलत होते. त्यांच्या तोडांवर झापड मारली आहे. आता तर नवनीत राणा यांना बजरंग बलीचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्या अमरावतीतून प्रचंड मताने निवडून येतील. असा दावाही त्यांनी केलाय.
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
दरम्यान, नवनीत राणांच्या विरोधात कुणी कितीही बोलले, तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी पाच वर्षात केलेली कामे जनतेसमोर आहेत. कुणी कितीही दुषणे दिली. तरी त्याची चिंता करू नका. त्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त झालाय. केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी राणा यांना १४ दिवस तुरूंगात ठेवले होते. बारा तास कोठडीत उभे ठेवले. आपल्या देशात हनुमान चालिसा म्हणायची नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का ? असाही सवाल फडणवीसांनी ठाकरेंना केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”