मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बारामती अॅग्रोबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहेत. यातच पंधरा दिवसात रोहित पवारांनी या कारवाईबाबत आपलं लेखी म्हणणं लिहून प्रदूषण मंडळाला पाठवावं असेही आदेश दिले आहेत. यामुळे रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने रोहित पवारांच्या बारामती अग्रो कंपनीतील दोन प्लाॅट संदर्भात नोटीस पाठवली होती. नियमांचं उल्लंघन करत असल्याचं म्हणत दोन्ही प्लाॅंट बंद करण्याची रोहित पवारांना नोटीस धाडली होती. त्यानंतर रोहित पवारांनी उच्च न्यायालयात या कारवाईबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेत कोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख
दरम्यान, बारामती अॅंग्रो कंपनीबाबत कारवाई करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर रोहित पवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरूवातीला तीन दिवस कोणतीही कारवाई न करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. त्यानंतर पंधरा दिवस आणि आता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेले आदेशच रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार