पुणे : राज्यात काही दिवसापासून आमदार संजय शिरसाठ आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संजय शिरसाठ यांच्यावर आता सुषमा अंधारे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राज्यात एक वेगळीच दिशा मिळाली असून यामुळे राजकीय वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही”
संजय शिरसाठ यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेही माझी तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षातील शितल म्हात्रे प्रकरणात लोकांना तात्काळ अटक होते, गुन्हा दाखल होतो. गणेश बीडकर भाजपचे आहेत. नुसत्या त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा डॉंन्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाला. यातच नाना पटोले यांच्या प्रकरणात तुम्ही वेगळा न्याय करता अन् इथे वेगळा न्याय करता. हा तुमचा दृटप्पटीपणा जगासमोर आणायचं असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
हेही वाचा…“भिर्रर बारीच्या मैदानात मंगलदास बांदलांची गाडी सुसाट”, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
दरम्यान, अडगळीत पडलेल्या शिरसाटांना कोणी ओळखत नव्हते. शिरसाठ हे नावसुद्धा कोणाला माहिती नव्हते. पण, माझ्याबरोबर नाव चर्चेत आल्याने शिरसाटांना लोक ओळखत आहेत. आमदार असूनसुद्दा त्यांना गल्लीतले काळ कुत्रेही विचारत नव्हते. मला स्टंट करायचा असता किंवा आर्थिक लाभ पाहिजे असता, तर लाखो-कोटी रुपयांची मागणी केली असती. फक्त तीन रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करत आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
हेही वाचा…बोटीच्या अपघातातून उदय सामंत, संभाजी राजे सुखरूप, अपघाताचं समोर आलं कारण
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”
हेही वाचा…“तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती, पण फक्त तीन रूपयाची मागणी केली”