मुंबई : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच, यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील दोषींवरील कारवाई टाळण्यासाठी विदर्भातील एक मोठा नेता हस्तक्षेप करत असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
भंडारा येथील 10 चिमुकल्या बाळाच्या हत्ये नंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड गुलदस्त्यात जावे म्हणून . निष्पाप मृत तान्ह्या बाळाच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका ? म्हणून धमकावले जात आहे? कोणा कोणाचा आवाज दाबणार आहात ? #MVA
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 10, 2021
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक बातमी शेअर करत ‘विदर्भातील एका बड्या नेत्याच्या दबावामुळे अजूनही चौकशी समिती समोरही येऊ दिले नसेल तर अशाने नोकरशाही सोकावेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे’, असा इशारा देत सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकार “माझा जीव माझी जबाबदारी” या तत्वावर जगावे असे सुचवत आहे काय? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
भंडारा अग्निकांड आतील दोषींना विदर्भातील एका बड्या नेत्याच्या दबावामुळे अजूनही चौकशी समिती समोरही येऊ दिले नसेल तर महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार "माझा जीव माझी जबाबदारी" या तत्वावर जगावे असे सुचवत आहे काय?… अशाने नोकरशाही सोकावेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे… pic.twitter.com/bAJwK4qzqp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 12, 2021
दरम्यान, याआधी देखील भंडारा येथील 10 चिमुकल्या बाळाच्या हत्येनंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड गुलदस्त्यात जावे म्हणून, निष्पाप मृत तान्ह्या बाळांच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका म्हणून धमकावले जात आहे? कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात? असा जाब भातखळकरांनी सरकारला विचारला होता.
Read Also :
- ‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- … अन् महिलेने भररस्त्यात राज्यमंत्री भरणे यांची कॉलर धरली
- नारायण राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच – राऊत
- मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी