पुणे : मातंग समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 1985 साली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ भ्रष्ट मार्गाने लुबाडली गेल्यामुळे भागभांडवलाच्या खात्यामध्ये सध्या अवघा एक लाख रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. बीजभांडवल योजनेचा सर्व निधी संपला असून, तिजोरीत खडखडात झाल्याने महामंडळ कर्जबाजरी झाले आहे. अशी बातमी महाराष्ट्राने टाईम्सने दिली. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कर्जबाजारी झाले असून भागभांडवलाच्या खात्यामध्ये आता फक्त १ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. “साहित्यरत्न” हे रत्नासारखे बाजारात विकता आले असते तर महाविकास आघाडीने तेही विकले असते. मातंग समाजाचा आधारवड या सरकारने मुळासकट उपटून टाकला. असा घणाघात देखील चित्रा वाघ यांनी केला.
राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही
महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असल्याने मातंग समाजातील तरूण- तरूणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. निधी उपलब्ध झाल्यास महामंडळाचा कारभार हा पुर्ववत होऊ शकणार आहे. असं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने महाविकास आघाडीवर टिका करीत आहेत. विविध मुद्दयांवरून त्या आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अण्णा भाऊ साठे विकास महामंडळावरून सरकारवर टिका केली आहे.
Read also:
- राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले
- काॅंग्रेसची गळती अजूनही सुरूच; कपिल सिब्बल यांची काॅंग्रेसला सोडचिठ्ठी
- मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा
- “शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
- “पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल