मुंबई : राज्यपालांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता उद्याच चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बहुचाचणीच्या वेळी आसन व्यवस्थेचा आढावा घेेण्यासाठी भाजपने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.
आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
बहुमत चाचणीच्या वेळी विधिमंडळाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था उत्तम, परिपुर्ण असावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सचिव सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आम्ही काही सुचना मांडल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात आश्वासन दिलं. वर्तमानपत्रातून तसेच काही टिव्ही चॅनेलच्या माध्यामातून काही लोक धमक्या, गुंडागिरीची भाषा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही आमदाराला आपला अधिकार शांतेता बजावता आलं. पाहिजे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
“एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
विधानसभा उपाध्यक्षांच्या लक्षात आणुन द्यायचं आहे की, याठिकाणी आतंकी, दानवी, गुंडप्रवृत्ती केल्याचा प्रयत्न केला तरी येथील पोलिस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. एकनाथ शिंदे यांनी मविआमधील फुटीच्याबाबत भाष्य केलं आहे. मग सरकार अल्पमतातील सरकार लोकशाहीवर जबाबदस्ती का करत आहेत? जे तुमचे आमदार तुम्हाला टिकावता येतं नाही तर राज्यापालांवर टीका का करत आहेत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही म्हणजे दगडांचे, तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अन् बाकी 40 आमदार म्हणजे हाड रक्त वाहूनचे आहेत की त्यांच्यावर परिणाम होतो. सुपीक डोक्यातील नापिक कल्पनांना जनता कुठेही भीक घालत नाही. तसेच खुर्ची तुटेपर्यंत सोडू नये, यासाठी लोकशाही आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु हॉटेलमधून बंडखोर आमदार दोन लक्झरी बसने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात जात असताना बच्चू कडू यांनी जादूटोणा केला म्हणून दर्शनासाठी जात असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर कामाख्या देवीच्या कृपेने सर्व काही होईल, उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read als
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना