मुंबई : मालेगावच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधला. तसेच सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून एकनाथ शिंदे यांनी काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरही टिका केली. यावरून आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो की सावरकर आमचे दैवत असून त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेसला एकप्रकारे इशाराच दिला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की, सावरकर आमचे दैवत आहे. आणि त्याच सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काॅंग्रेससोबत, राहुल गांधी-सोनिया गांधीसमोर केवळ सत्ता मिळवण्यासाठी हात जोडून उभे होते, अजूनही आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवा. असं केशव उपाध्यय यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत असं म्हटलं की, अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर होते. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ होती. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही. १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच आहे. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय. आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही. लोकशाही वाचवण्याची आहे. असं उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत जाहीरपणे सांगितले आहे.
Read also
- हेही वाचा…“महाराष्ट्राला पवार नावाची कीड”, पडळकरांची टिका, “गोप्याच्या बुडाला आग..”मिटकरींचा पलटवार
- हेही वाचा…““हिमंत असेल तर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा,” सुहास कांदे यांची मागणी
- हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा
- हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा