मुंबई : राज्यात सध्या राजकीय नेत्यांच्या सभांचा धडका सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शीवतीर्थावर जाहीर सभा झाली. त्यानंतर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर जाहीर सभा झाली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जहरी टिका केली आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
काल सधू आणि मधू भेटले. मालेगावची सभा विराट सभा झाल्यानंतर त्यांच्या भावना उचबळून आल्याने ते एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी गेले असतील. विरोधी पक्षाला वेगळा रस्ता आणि सत्ताधारी पक्षाला वेगळा रस्ता, अशी वेळ अजूनही लोकशाही देशात आली नाही. ते आणू शकत असतील तर त्यांनी आणावी. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
तसेच महाराष्टासाठी आणि देशासाठी वीर सावरकर हे राजकारणासाठी नाहीतर आदराचा विषय आहे. देशासाठी सावरकरांनी १४ वर्ष आपलं आयुष्य अंदमानमध्ये घालवलं, ते फार कठीण होतं. तसेच सावरकर जर जिवंत राहिले असते तर त्यांची बाजू त्यांनी मांडली असती. त्यामुळे अशा व्यक्तीबाबत आरोप करणे हे फार चुकीचं आहे. असंही संजय राऊतांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा
- हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
- हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
- हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर