धुळे : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्यांमुळे चांगलचं चर्चेत आलं. अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने आल्याचं दिसून आलं. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ देखील बघायला मिळाला. यातच आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीने देखील तयारी सुरू केली असून त्यांचा महाराष्ट्रा दौरा सुरू झाला आहे.
हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे ध्यास प्रगतीचा या दौऱ्याला राष्ट्रवादीने उत्तर महाराष्ट्रपासून सुरूवात केली आहे. या दौऱ्यात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला. या दौऱ्याची सुरूवात आज राष्ट्रवादीने धुळ्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून केली.
हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”
या बैठकीत या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते एकनाथर खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा-तळोदा विद्यार्थी अध्यक्ष कुणाल पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
दरम्यान, स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल, असा दृढ विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया, अशी सूचना जयंत पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.
Read also
- हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
- हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
- हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
- हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक