पुणे : पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी जहरी टिका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. त्याच्यावर आता राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधत जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी पवारांच्या विरोधात बोलतो, याचा अर्थ नीट समजून घ्या. कारण, पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली, ती मुळापासून काढून टाकावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा कार्यकर्ता २०१४ साली मुख्यमंत्री झाला. २०१४ ते २०१९ महाराष्ट्राला विचार केला, तर शेतकऱ्यांना काय लागतं ? त्याचा योग्य उपाय काढणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा लाभला. असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
त्यावर आता अमोल मिटकरी यांनी त्यावर खोचक टोला हाणला आहे. ते म्हणाले की, हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल. असा टोला मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे.
हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023
Read also
- हेही वाचा…““हिमंत असेल तर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा,” सुहास कांदे यांची मागणी
- हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा
- हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा
- हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल