मुंबई : शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून मागील दोन दिवस राज्यात राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं सांगण्यात आलं. परंतु पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर हसत खेळत गप्पा मारतांना दिसले. आता या प्रकरणावर मंत्री दिपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी बोलत असतात. त्यावेळी त्यांच्या तोंडी मोदी साहेबांचं दहा वेळा तर देवेंद्र फडणवीस यांचं पाच सहा वेळा तरी नाव असतं. ज्यावेळेला ते राज्याबद्दल बोलतात. त्यावेळेला आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तसेच अशी एकही क्लिप दाखवावी, की ज्या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचं नाव घेतलेलं नाही. असंही दिपक केसरकर यांनी म्हटलं.
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
दरम्यान, पालघर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगदी दोन तास खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा केली. कोल्हापुर येथील कार्यक्रमात त्यांना कानाचा प्रॉब्लेम आल्याने त्यांनी कोल्हापुरचा कार्यक्रम जाण्याचं टाळला. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं