मुंबई : राज्याच्या दोन प्रमुख पक्षाचे दोन मुख्य नेते, दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी. होय! राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी असतात.
काँग्रेसने परत छेडले शिवसेनेला? पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली की स्तुती?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोघांच्या हातून, राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. मात्र हे सरकार केवळ ८० तासंसाठी टिकलं आणि यांनतर जे घडलं त्याचा ना राज्याने विचार केला होता ना देशाने! एकेकाळचे कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांनी हातात हात घालून भाजपाला सत्तेतून दूर फेकले.
एकनाथ खडसेंना मोठा धक्का! जावयावर ईडीने केली मोठी कारवाई
दरम्यान, यांनतर आत्तापर्यंतच या सरकारने काय केले? काय नाही? याचा लेखाजोखा जनतेसमोर आहेच. मात्र, आज पुन्हा हे दोन्ही नेते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले, ते वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी केलेल्या एकसारख्या घोषणेमुळे! राज्यातील महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, “कुणीही कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नये, गर्दी जमवू नये, भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत,” अशा प्रकारचे संदेश त्यांनी दिले आहेत.
मोदींनी मन जिंकले : भर पावसात स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले
तसेच, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा समाज माध्यमांवरून द्याव्यात आणि मुख्यतः सर्वांनी महामारीच्या नियमांचे पालन करुन राज्याला लवकरात लवकर महामारीमुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे. तुमच्याकडे वाढदिवसासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या महामारीविरोधात लढ्याणाऱ्या संस्थांकडे द्यावा. कुणीही होर्डिंग, बॅनर लावू नयेत. वृत्तपत्रातून किंवा टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, याचे उल्लंघन झाल्यास पाखाकडून गंभीर कारवाई करण्यात येईल,” असा एकच संदेश दोन्ही नेत्यांनी दिला आहे.
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
या दोन्ही नेत्यांच्या जवजवळ सारख्याच असणाऱ्या या संदेशांमुळे आणि सूचनांमुळॆ राज्याच्या राजकीय वर्तुळत पुन्हा एकदा यांच्या योगायोगाचे आणि ‘त्या’ ८० तासांच्या सरकारच्या चर्चा झाडू लागल्या आहेत.
Read Also :
- फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
- मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, आशिष शेलार म्हणतात…
- उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
- पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती
- “पंतप्रधान-गृहमंत्र्यांना दिलेली सुरक्षा अनावश्यक” म्हणणाऱ्या राऊतांची, चित्रा वाघ यांनी उडवली खिल्ली