मुंबई : भारतीय उपखंडातील सर्व देशांमध्ये विकास व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारताने कायमच पुढाकार घेतला. त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत. स्वातंत्र्यसैनिकांनी अतिशय मेहनत करून या देशाला प्रगतीच्या मार्गावर आणलं. या देशाची उज्वल परंपरा आणि अपेक्षा यांची सांगड घातली. सगळ्याना अन्न- वस्र्-निवारा मिळाला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला पाहिजे, चांगलं राहणीमान मिळालं पाहिजे, यासाठी नव्या भारताची पायाभरणी केली गेली. आज आपण जो भारत पाहतोय त्या भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिली. ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींनी केलं. मात्र भारत या शक्तींसमोर हरणार नाही. त्यासाठी काॅंग्रेस हवीय. असं म्हणत काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
काँग्रेसने जगाला एक नवा भारत दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कट्टरतावाद आणि धर्म स्वीकारलेला पाकिस्तान कुठे राहिला, हे आपण सर्वांनी पाहिलं. आज भारत जगातील एक प्रबळ देश म्हणून पाहिला जातो. दुसरीकडे, भारताच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला बांगलादेश आज एक प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही यांच्या रक्षणासाठी काँग्रेस रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेल. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था तर आपण बनणारच आहोत, पण आमचं स्वप्न आहे जगातील सगळ्यांत जास्त दरडोई उत्पन्न भारताचं असावं. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, इथल्या सगळ्या नागरिकांच्या हाताला काम असावं. जगातील सर्व प्रगत तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भारतात निर्माण व्हाव्यात, भारतातील सामान्य लोकांचं जीवनमान उंचवावं. या देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात. कोणीही मागे राहू नये. उच्च-नीच भाव संपावा. या देशात दंगे-धोपे होऊ नयेत, द्वेषापोटी हिंसा होऊ नये, कुणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये कुणाचीही ढवळाढवळ असू नये, सगळ्यांना उपासनेचा अधिकार असावा, राज्यघटनेचं योग्य रितीने पालन व्हाव… या देशासाठी काँग्रेसचं हे व्हिजन आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नाही तर या देशातील सर्व भागांचा मानवीय विकास व्हायला पाहिजे हे आमचं धोरण आहे. मला वाटतं या देशातील सर्व तरूणांनी द्वेषाच्या राजकारणापासून या देशाला मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट केले पाहिजेत.
READ ALSO :
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा