मुंबई : शरद पवार आतापर्यंत कुणालाच ओळखता आले नाहीत. त्यामुळे त्यांना मी ओळखणे हा तुमचा गैरसमज आहे. मी ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या नोटीसा आदी गोष्टींना घाबरून भाजपसोबत गेलो नाही. या गोष्टी अनेक वर्षापासून सुरू आहेत. सर्व माननीय नेते त्याठिकाणी होते. त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे माझ्यासारख्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता वेगळा विचार करण्याचा प्रश्नच उद्धवत नव्हता. आम्ही त्यांच्यासोबत गेलो अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
आम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची विचारधारा सोडली नाही. पवार साहेब आमचे दैवत व आधारस्तंभ आहेत. पण पक्ष म्हणून घेतलेली भूमिका हा महायुतीचा भाग होता. सर्व आमदारांची कामे होणे, मतदार संघाचा विकास होणे या गोष्टी आमदार म्हणून आमची जबाबदारी आहे. देव देव्हाऱ्यात व मनात आहे. आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये असे म्हटले तरी, भक्त देवाला मनातल्या मनात पुजतच असतो. असंही मुंडेंनी म्हटलं.
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडण्याचा निर्णय मी घेतला नाही. ११ जानेवारी २०१२ साली गोपीनाथ मुंडे यांनी भूमिका घेतली की, माझ्या वडिलांचा आणि माझा त्यांच्याशी, कुटुंबाशी आणि भाजपाशी काहीही संबंध नाहीत. मग मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटलो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेता. मला आणि माझ्या वडिलांना बाजूला करण्यात, आम्ही लायक होतो की नालायक या गोष्टी कारणीभूत होत्या. पण अनेक वर्ष माझ्या वडिलांनी कष्ट घेतले वयाने मोठे असले तरी नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे गोपीनाथ मुंडेंसमोर माझे वडील झुकायचे असंही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल