मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने शिंदे सरकारचा पहिलाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. निम्म अधिवेशन झालं असून सोमवारी आणि मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी आहे. दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्याने या अधिवेशनात उजवे कोण ठरले? याची आता चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोण अधिक उजवे याची स्पर्धा असली तरी दोन आठवड्यांच्या कामकाजावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच अधिक पगडा बघायला मिळाला. विधिमंडळ अधिवेशन म्हणजे खरे तर मुख्यमंत्र्यांंची अधिक परीक्षा असते. कारण विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागते. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ९ जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. राष्ट्रवादीच्या सुमारे ३५ ते ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याने विरोधी बाकांवर मोठा खड्डा पडला आहे. विरोधकांमधील आक्रमकतेची धार कमी झाल्याने सत्ताधारी निश्चित असले तरी सत्ताधाऱ्यांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात एवढी गर्दी असते की त्यांना सभागृहात येण्यास फारसा वेळ मिळत नाही. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री सभागृहांमध्ये उपस्थित राहून कामकाजावर लक्षत ठेवत असतात. तरीही फडणवीस हे अधिक प्रभावी जाणवतात.
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
गृह, ऊर्जा, जलसंपदा सारखी महत्वाची खाती असली तरी मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा अनुभव असल्याने कोणत्याही विषयावर ते प्रभावीपणे बाजू मांडू शकतात. दुसऱ्या आठवड्यात तर बाह्ययंत्रणेकडून पोलीस तैनात करणे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कमलाचा लोकप्रतिनिधींना होणारा त्रास, महारेरा ग्राहकांची होणारी फसवणूक, निधीवाटप या सर्वच विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्वांवर फडणवीस यांनीच बाजू मांडली. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यामध्ये फडणवीस यांचेच नाव अधिक झळकले. यामुळेच कामकाजाच्या दुसऱ्या आठवड्यात सरकारकडून तरी फडणवीस यांचीच अधिक छाप पडली.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका