मुंबई : एका वर्षापुर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. तर यावर्षी अजित पवार आपल्या ३० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडले. यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे आता दोन्ही गटात हातावर मोजतील इतकेच आमदार सोबत राहिले आहेत. यावरून आता भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
भाजपच्या आमदारांसह तुषार भोसले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टिका करीत आहेत. यामुळे मोठा वाद देखील निर्माण होतो. तर अशाच पद्धतीने तुषार भोसले यांनी केलेल्या टिकेनंतर आता मोठा वाद निर्माण होऊ शकतो. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अवस्था ओसाड गावाचे पाटील अशी केली असल्याची टिका तुषार भोसले यांनी केली आहे.
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
दरम्यान, शिवसेने फुटीमागे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. परंतु त्यानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा केली जात आहे. त्यामुळे आता तुषार भोसले यांनी केलेल्या टिकेवर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया देण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मा. अमितभाई आणि मा. देवेंद्रजींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘ओसाड गावाचे पाटील’ अशी केली आहे. @AmitShah @Dev_Fadnavis
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) July 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक