मुंबई : काही दिवसापुर्वी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत शरद पवार यांनी देखील एनडीएमध्ये यावं अशी मागणी अजित पवार समर्थक आमदारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु या गोष्टींकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केले. यातच पक्षाला बसलेला मोठा फटका यामुळे शरद पवारांनी आता पुन्हा रणनीती आखली आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही प्लॅन केले आहेत. या प्लॅननुसार राष्ट्रवादीला पुन्हा मजबुत करण्यासाठी संघटनात्मकदृष्ट्या बाबींकडे लक्ष ठेवण्यात आलं आहे. यानुसार राज्यातील, तालुक्यातील प्रमुख माजी आमदारांना पुन्हा सक्रिय करून त्या त्या मतदारसंघात आपला उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया केली जात आहे. तसेच राष्ट्रवादीचं प्राबल्य ज्या मतदार संघात आहे. त्या मतदारसंघावर जास्त करून लक्ष दिलं जात आहे.
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
दरम्यान, भाजपकडे सध्या इच्छुकांची संख्या जास्त असून ज्या ज्या उमेदवारांना डावलण्यात आलं आहे. त्या सर्व आजी माजी आमदार, खासदारांना राष्ट्रवादीत येण्याचं आवाहन केलं जात आहे. या सर्व उमेदवारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये शरद पवार यशस्वी झाले तर भाजपची डोकेदुखी वाढू शकते. विद्यामान आमदारांचा सामाना करण्यासाठी शरद पवार माजी आमदारांमध्ये डाव लावणार आहेत. मात्र यात शरद पवार कितपत यशस्वी होतात हे पाहावे लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…