मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांच्या नंतर माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यातच आज ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले असता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाा साधला.
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता जय महाराष्ट्र. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
दरम्यान, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. एक लक्षात येतंय उलटं लक्षात येतंय, कोणी गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतं. मग ते रागाचं आहे, द्वेषाचं आहे, जिद्दीचं आहे आणि जिंकण्याची इर्षाही आपली आणखी वाढतेय. त्यामुळे जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?