मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर निवडणुक आयोगाने काल महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव निवडणुक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काल दिवसभर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं. यावर निर्णयावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
कालपासून सर्वात जास्त दु: ख जर कोणाला झालं असेल तर, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला. तुम्ही सोशल मीडियावर बघा ट्विटवर बघा. सर्वात मोठा दु:ख काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला झालेला आहे. जणू काही यांचंच चिन्ह त्या ठिकाणी गेलं आणि यांच्याच पक्षाचे नुकसान त्या ठिकाणी झालं. इतका मोठा आघात या दोन्ही पक्षावर झालेला आहे. त्यामुळे हे बोलतात. अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षाचा आहे. असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
विधानसभेचे अध्यक्षावर अविश्वास दाखल असताना त्याला अपात्रतेची कारवाई करता येत नाही आणि नाव व प7 आम्हाला मिळालेला असल्यामुळे आमचा पक्ष हा अधिकृत आहे, याचा अर्थ असा निघतो आणि आमचा पक्ष अधिकृत असल्याने आता उरलेल्या 14 आमदारांना आता घरी पाठवायचं का? काय करायचं ते शिंदे साहेब ठरवतील असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..““हिंदुत्वाचा विचार हा कसब्यातील मतदारांचा आत्मा, येथे भाजपाशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार नाही”, हेमंत रासने
- हेही वाचा..“ना रॅली, ना सभा, तरी पोटनिवडणुकांबाबत अमित शहांच्या पुणे दौऱ्याची विरोधकांना धास्ती”,
- हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला