पुणे : राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. यातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे. यातच शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी गोगावले यांच्यावर सडकून टिका केलीय.
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
महिला आणि पुरूष आमदारांमध्ये नेमका काय फरक असतो हे पण भरत गोगावले यांनी जाहीरपणे स्पष्ट सांगावे. रायगड म्हणजे छत्रपतींची भूमी. ज्या छत्रपतींनी कायम महिलांचा सन्मान केला. तिथल्याच आमदाराने एका महिला लोकप्रतिनिधीला पुरूषापेक्षा दुर्बेल समजावे यापेक्षा दुर्दैव ते काय? अशा नेत्यांकडून महिला सुरक्षेची अपेक्षा तरी कशी ठेवायची? असा सवाल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
शिंदे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळात भरतशेठ गोगावले मंत्रिपदासाठी आतुर आहेत. यातच त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री देखील हवं आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी करीत आहेत. यातच अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद म्हणून चांगलं काम केलं असलं तरी त्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरूषांमध्ये काही फरक आहे की नाही. असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी